देसाईगंज: तरुणांनी उद्योजक बनण्यासाठी केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना अंमलात आणली असुन सन २०२०-२१ ते २०२४-२५ अशी ५ वर्षे राबविली जाणार आहे या योजने अंतर्गत अन्य प्रक्रिया संबधीत सर्व उद्योग करता येतील या योजनेमध्ये प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के व कमाल १० लाख असे अनुदान देण्यात येणार आहे तसेच प्रकल्प किंमतीच्या ९० टक्के पर्यंत बँक कर्जाची सोय या योजने मध्ये करण्यात आली आहे या योजने अंतर्गत वडसा तालुक्यातील किन्हाळा येथे हितेश नाकाडे यांनी आटा व मसाले उद्योग चालु केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला तालुका कृषि अधीकारी निलेश गेडाम, बँक ऑफ इंडिया वडसाचे शाखा व्यवस्थापक शेख, जिल्हा संसाधन व्यक्ती आशिष चापले, कृषि सहाय्यक मडावी व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी तालुका कृषि अधिकारी निलेश गेडाम यांनी तालुक्यातील इतर तरुणांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन केले तर शाखा व्यवस्थापक शेख यांनी बँक संबंधी माहिती दिली जिल्हा संसाधन व्यक्ती आशिष चापले यांनी या योजने बद्दल सविस्तर माहिती दिली योजने अंतर्गत वैयक्तीक लाभार्थी स्वयं सहाय्यता बचत गट सहकारी संस्था, शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी पतसंस्था इत्यादींना लाभ घेता येतो. योजने अंतर्गत अर्ज सादरिकरण प्रशिक्षण, बैंक सहकार्य व इतर कामात कृषि विभागातर्फे सहकार्य केले जाणार आहे तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व अधिक माहिती साठी व अर्ज सादरिकरणासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय वडसा येथे भेट द्यावी, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी निलेश गेडाम यांनी केले आहे.
Related Articles
गुरु नानक यांचे कार्य प्रेरणादायी- उपमुख्यमंत्री
मुंबई दि. 8: “समाज, देश, संस्कृती, धर्म वाचवण्यासाठी गुरू नानक यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लढा दिला. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांचा इतिहास अविस्मरणीय आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले. गुरुनानक जयंतीनिमित्त मुंबई येथे आयोजित प्रकाशपूरब कार्यक्रमात ते बोलत होते. “गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त व प्रकाश पावन पर्व वर्षानिमित्ताने मला गुरू ग्रंथसाहेब यांचे दर्शन व […]
ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील महाराष्ट्राच्या बेस्ट प्रॅक्टिसेस सर्वोत्तम
ई -रजिस्ट्रेशन प्रणाली या महत्वपूर्ण उपक्रमाविषयी सविस्तर सादरीकरण मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र शासनाच्या सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र स्थलांतर प्रणाली, रस्ता गुणवत्तेसाठी कृत्रिम बुद्धिमतेचा वापर, वेध अप, ई रजिस्ट्रेशन प्रणाली या महत्वपूर्ण उपक्रमाविषयी आज झालेल्या विभागीय ई गव्हर्नस परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली. या सत्राच्या अध्यक्षस्थानी यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम होते. महाराष्ट्र शासनाने ई-गव्हर्नन्सवर विशेष […]
लंपी व्हायरस (रोग) काय आहे ?
Lampi Virus Details in Marathi : शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे माजलेला हाहाकार म्हणजे Lampi Virus होय. नेमकं Lampi Virus किंवा Lampi Skin Disease काय आहे ? या रोगाची मुख्य कारण काय ? लक्ष्यण काय ? यासाठीच्या काय उपाय योजना करायला हव्या याबदल आपण सर्व माहिती आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. भारतामध्ये जवळपास आठ राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशामध्ये लंपी Virus या […]