मुंबई : अनुसूचित जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून अर्जाची अंतिम मुदत ४ सप्टेंबर २०२६ अशी आहे. या योजनेचा उद्देश आर्थिक अडचणींमुळे उच्च […]
Author: Lokrath Team
गडचिरोलीच्या विकासातून संपूर्ण विदर्भाच्या प्रगतीला नवी गती – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
देशाचा गडचिरोलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला; ‘व्हिजन २०४७’मधून सर्वांगीण विकासावर भर गडचिरोली, दि. १६ (जिमाका) : एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता वेगाने बदलत असून संपूर्ण देशाचे लक्ष या जिल्ह्याकडे वेधले जात आहे. समृद्ध नैसर्गिक व खनिज संपदा, सुधारत असलेली दळणवळण व्यवस्था, औद्योगिक विकास, शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून गडचिरोली महाराष्ट्रातील […]
मातृ वंदन योजनेतून गर्भवती व स्तनदा मातांना आर्थिक आधार
मातृ वंदन योजनेतून गर्भवती व स्तनदा मातांना आर्थिक आधार पहिल्या अपत्यासाठी ₹5 हजार, तर दुसरे अपत्य मुलगी असल्यास ₹6 हजारांचा लाभ; पात्र महिलांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुलचेरा, जि. गडचिरोली : गर्भवती महिला व स्तनदा मातांना गर्भावस्था आणि प्रसूतीनंतरच्या काळात आर्थिक आधार मिळावा, तसेच माता व बालकांचे आरोग्य सुधारावे, या उद्देशाने केंद्र शासनाची प्रधानमंत्री […]
महा-डीबीटी 2.0 अंतर्गत 29 नवीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना सुलभतेने मिळणार
महा-डीबीटी 2.0 अंतर्गत 29 नवीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना सुलभतेने मिळणार मुंबई : राज्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने मिळावा, या उद्देशाने महा-डीबीटी 2.0 अंतर्गत 29 नवीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. महा-डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून […]
सिमकार्ड आहे, पण सिग्नल नाही! रेंगेवाई गावात मोबाईल टॉवरअभावी नागरिक त्रस्त; पाण्याच्या टाकीवर उभे राहून नेटवर्क शोधण्याची वेळ
सिमकार्ड आहे, पण सिग्नल नाही! रेंगेवाई गावात मोबाईल टॉवरअभावी नागरिक त्रस्त; पाण्याच्या टाकीवर उभे राहून नेटवर्क शोधण्याची वेळ मुलचेरा, जि. गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील रेंगेवाई गावात मोबाईल नेटवर्कअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील नागरिकांकडे मोबाईल फोन आणि विविध कंपन्यांचे सिमकार्ड आहेत; मात्र गावात पुरेसा मोबाईल सिग्नल उपलब्ध नसल्याने साधा फोन करण्यासाठीही नागरिकांना […]
भूमी अभिलेख कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
सिरोंचा : भारताच्या स्वातंत्र्याचा ८० वा स्वातंत्र्यदिन भूमी अभिलेख कार्यालय, सिरोंचा येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यालय परिसरात आकर्षक […]
सातबाऱ्यावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; २.३९ लाख शेतकऱ्यांचा ‘अॅग्रीस्टॅक’चा मार्ग होणार मोकळा
सातबाऱ्यावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; २.३९ लाख शेतकऱ्यांचा ‘अॅग्रीस्टॅक’चा मार्ग होणार मोकळा तांत्रिक अडचणींमुळे शासकीय योजनांपासून वंचित राहणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना दिलासा; अधिकृत रेकॉर्ड उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती मुंबई : सातबारा उताऱ्यावर नाव नसल्यामुळे किंवा जमीन नोंदी अद्ययावत नसल्याने शासकीय कृषी योजनांचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल […]
गडचिरोली जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात मुलचेरा तालुक्याचा डंका!
‘जय बिरसा मुंडा नैसर्गिक शेती गट, गोमनी’ प्रथम; ‘कोया पूनेम महिला शेतकरी गट, धन्नुर’ तृतीय गडचिरोली : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात मुलचेरा तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी करत वर्चस्व सिद्ध केले आहे. या महोत्सवात मुलचेरा तालुक्यातील ‘जय बिरसा मुंडा नैसर्गिक शेती गट, गोमनी’ या गटाने प्रथम क्रमांक, तर ‘कोया […]
देशबंधुग्राम येथे लाळखुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात
मुलचेरा : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तालुक्यात लाळखुरकत (FMD) रोग प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या ९व्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. TVC-मुलचेरा अंतर्गत १३ ऑगस्ट रोजी देशबंधुग्राम येथे या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. लाळखुरकत हा जनावरांमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य रोग असून, त्यापासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी नियमित लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. मोहिमेदरम्यान पशुवैद्यकीय पथकाकडून गावातील पात्र जनावरांना लसीकरण […]
जपतलाई दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; आश्रमशाळांची सुरक्षा व्यवस्था तातडीने सुधारा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके
*जपतलाई दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; आश्रमशाळांची सुरक्षा व्यवस्था तातडीने सुधारा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके* *तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर जपतलाई आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी* *विद्यार्थ्यांची १५ ऑगस्टपर्यंत सुरक्षित ठिकाणी शैक्षणिक व निवासी व्यवस्था करण्याचे निर्देश* *राज्यातील ५१३ अनुदानित आश्रमशाळांची तीन महिन्यांत तृतीय पक्षीय तपासणी* *सर्व आश्रमशाळांची छायाचित्रांसह तपासणी; सुरक्षा, आरोग्य, […]










