ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ! – शेतकऱ्यांना आता दिवसाही मिळणार वीज

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली, यामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांची दिवसा वीज मिळण्याची मागणी पूर्ण होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

*पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री*

▪️ उपमुख्यमंत्री म्हणाले कि “सोलर प्रोजेक्टसाठी काही खासगी आणि सरकारी जमीनी घेण्यात येतील तीस वर्षानंतर त्यांची जमीन त्यांना परत मिळेल, दरवर्षी यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ होईल.

▪️ जो काही फीडर आहे त्याच्या पाच किमीच्या भागातील कुठलीही खासगी जमीन यासाठी घेणार आहोत. तसेच सरकारी जमीन असेल तर पाच-दहा किमी क्षेत्रातील जमीन आम्ही घेणार आहोत.

▪️ आज आपण शेतकऱ्याला जी वीज देतो ती सात रुपयांनी आपल्याला पडते त्यासाठी आपण दीड रुपया वसूल करतो बाकी आपण सबसिडी देतो. आता ही सोलरची वीज आहे ती दिवसा तर मिळेलच पण ही साधारण तीन रुपयांपासून ३ रुपये ३० पैशांपर्यंत पडणार आहे.

▪️ म्हणजे आज जी सबसिडी आपण देतो त्यात मोठ्या प्रमाणावर घट होईल, तसेच कोळशापासून वीजनिर्मिती करताना पर्यावरणाची हानी होतो ती होणार नाही. देशात असा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल.