ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कृषी प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कामाला गती द्यावी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि. २९ : पाटण तालुक्यातील काळोली येथे बाळासाहेब देसाई अद्ययावत बहुउद्देशीय कृषी प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करावयाची आहे. या बहुउद्देशीय कृषी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या कृषी प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कामकाजाला गती द्यावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. आज मंत्रालयात पाटण तालुक्यातील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

भारत रशिया संबंधांसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण पूरक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. २९ : “भारत व रशिया राजनैतिक संबंध स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाली असून उभय देशांमधील सांस्कृतिक व व्यापार संबंध शेकडो वर्षे जुने आहेत. सांस्कृतिक देवाणघेवाण भारत रशिया संबंधाला पूरक आहे”, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले. रशिया-भारत राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात येण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्योगांना आवाहन

महाराष्ट्रात ‘सिनार्मस’ची दोन टप्प्यात २० हजार कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. २९ :- महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून अधिकाधिक उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, त्यांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. इंडोनेशियास्थित मे. सिनार्मस पल्प ॲण्ड पेपर कंपनीला आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील धेरंड येथे २८७ हेक्टर जमिनीचे वाटप पत्र […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मंत्रिमंडळ निर्णय

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार मुंबई, दि. २९ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात आज १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाने १४ विभागांचा सखोल […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र शासन

१) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात आज १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाने १४ विभागांचा सखोल आढावा घेऊन सूचना […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती २०२२-२३

महाराष्ट्र राज्यातील तलाठी (गट-क) संवर्गाची दि.३१/१२/२०२० अखेर रिक्त असलेली १०१२ पदे तसेच तलाठी संवर्गाची नव्याने निर्माण करण्यात आलेली ३११० पदे अशा एकूण ४१२२ पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुषंगाने महसूली विभागनिहाय तलाठी (गट-क) संवर्गाच्या भरावयाचा पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी पद भरती २०२२-२३ – Maharashtra Talathi Bharti 2022: खालील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लिपिक टंकलेखन पदाची सर्वात मोठी भरती होणार, आयोगाने दिली माहिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीद्वारे येत्या एप्रिल महिन्यात लिपीक-टंकलेखक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या रिक्त असलेली आणि येत्या काळात रिक्त होणाऱ्या पदांचे मागणीपत्र प्रशासकीय विभागांनी आयोगाकडे पाठवावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांनी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभांगाना दिले आहेत. त्यामुळे लिपीक-टंकलेखक पदांची सर्वात मोठी भरती एप्रिलमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एमपीएससीने 1 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ब्रेकींग: शेतकऱ्यांना ‘या’ दिवशी नुकसान भरपाई मिळणार, कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा..

 शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असतो. उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा या ऋतूंमध्ये अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, ढगफुटी, गारपीट आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी! अशा नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य शासन देखील वेळोवेळी मदत करण्यासाठी पाऊले उचलून आर्थिक मदत देत आहे. आता यासंबंधी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठी घोषणा केली आहे.  कृषिमंत्री अब्दुल […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 28 : यंदाच्या 41 व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र भागीदार राज्य म्हणून सहभागी झाले होते. या मेळ्यात महाराष्ट्र दालनाला ‘भागीदार राज्य’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येथील प्रगती मैदानात 41 वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याची सुरूवात 14 नोव्हेंबरपासून  झाली होती. याचा समारोप रविवारी 27 नोव्हेंबरला झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ‘महाराष्ट्र दालना’ ला  पुरस्कार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि. 28 : महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्काराने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. येथील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2017, 2018 आणि 2019 साठीचे ‘शिल्प गुरू पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव रचना शहा, हस्तकला विकास आयुक्त व्यासपीठावर उपस्थित होते. उपराष्ट्रपती यांच्या हस्ते ‘शिल्प गुरू’ तर […]