गडचिरोली दि.२८ : जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बळकट करण्यासाठी सुरू असलेल्या ४५० किलोमीटर लांबीच्या ऑप्टिकल फायबर दुरुस्तीचे काम येत्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. ऑप्टिकल फायबर दुरुस्ती संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीत श्री पंडा बोलत होते. महाआयटीचे महाव्यवस्थापक मकरंद कुर्तडीकर, सहव्यवस्थापक नवनितकुमार, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक सुनील मोकडे आणि स्टरलाईट […]
विदर्भ
शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीची ‘दशकपूर्ती’ आणि ‘प्रथम सेवा हक्क’ दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा संपन्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यात याव्यात. शासनाच्या ज्या विभागाच्या सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन होणार नाहीत, त्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड आकारला […]
प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे. शासकीय कार्यालयातील कामे सहजपणे आणि विनातक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या आवश्यक कामांसाठी आता प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. […]
पर्यटनातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्याची संधी – मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे
संवाद, व्यापार, आणि संस्कृतीची देवाणघेवाण यासाठी किनारपट्टी भाग नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. भारत, मध्यपूर्व आणि युरोप या देशांना एकमेकांशी अधिक जवळ आणण्याची ही परंपरा सुरू ठेवण्याची गरज आहे. मध्यपूर्व देशांनी अलिकडच्या काळात पर्यटन क्षेत्रात जे सकारात्मक बदल घडवले आहेत, ते अत्यंत उल्लेखनीय आहेत. मध्यपूर्व देशांनी पर्यटन विकास करताना जी दूरदृष्टी दाखवली आहे ती कौतुकास्पद असल्याचे […]
जपानी कंपन्यांना भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मोठी संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारत लहान अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा विचार करत आहे. जपानी कंपन्यांना यात मोठ्या संधी आहेत. भारत सरकार अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणूक सुरू करण्यासाठी कायद्यात बदल करत आहे. थोरियम इंधनाच्या वापराबद्दलही संशोधन सुरू आहे. सौर पॅनेल आणि टर्बाइन ब्लेड रीसायकलिंग मध्येही जपानकडे उत्तम तंत्रज्ञान आहे. जपानी कंपन्यांना भारतात सौर क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे […]
तहसील कार्यालय मूलचेरा येथे २८ एप्रिल हा दिवस पहिला”सेवा हक्क दिन” म्हणून साजरा
राज्य सेवा हक्क आयोग तसेच आपले सरकार पोर्टलच्या माध्यमाने “नागरिकांना सुलभ, पारदर्शक वेळेत सेवा देणे तहसिलदार चेतन पाटील मुलचेरा :- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीस दहा वर्ष पूर्ण होत असल्याने, या दशकपूर्तीचे औचित्य साधून मुलचेरा तालुक्यात २८ एप्रिल रोजी तहसिल कार्यालय यथे “सेवा हक्क दिवस” विविध उपक्रम राबवून हा दिवस जनसहभागासह साजरा […]
मार्कंडा मंदिराच्या जिर्णोद्धाराला गती द्या– सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
नऊ कोटींच्या विकासकामांना लवकरच होणार सुरुवात गडचिरोली दि. २५ – राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज मार्कंडा देवस्थान येथे भेट देऊन मंदिराच्या जिर्णोद्धार व विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पुरातत्व विभागाला अधिक कामगार नियुक्त करून मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम गतीने काम पूर्ण […]
जागतिक हिवताप दिनानिमित्त प्रभातफेरीतून जनजागृती
“हिवतापाला संपवू या : पुन्हा योगदान द्या, पुनर्विचार करा, पुन्हा सक्रिय व्हा” या संकल्पनेखाली आज जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून गडचिरोलीत विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हिवताप निर्मूलनासाठी जनतेला सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने शहरातून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे व जिल्हा शल्य चिकित्सक […]
गावागावातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन : जलरथाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी
महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ आणि ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या महत्वाकांक्षी योजनेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलरथाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज रवाना करण्यात आले. यावेळी जलसंधारण अधिकारी अमित राऊत, व्ही.बी. सयाम, उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष महेंद्र मंडलेचा, डॉ. गणेश जैन, निरज बोथरा […]
“दिव्यांग कल्याणासाठी परिणामकारक योजना प्रस्तावित करा” – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा जिल्हा नियोजनचा १ टक्का निधी दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवणार
गडचिरोली दि.24 : –जिल्हा नियोजनच्या विकास निधीतून चालू आर्थिक वर्षात दिव्यांग कल्याणासाठी एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार असून त्यातून दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडविणाऱ्या परिणामकारक आणि त्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कामांचे प्रस्ताव सूक्ष्म नियोजनासह तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन व्यवस्थापन समितीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात […]