भारत लहान अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा विचार करत आहे. जपानी कंपन्यांना यात मोठ्या संधी आहेत. भारत सरकार अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणूक सुरू करण्यासाठी कायद्यात बदल करत आहे. थोरियम इंधनाच्या वापराबद्दलही संशोधन सुरू आहे. सौर पॅनेल आणि टर्बाइन ब्लेड रीसायकलिंग मध्येही जपानकडे उत्तम तंत्रज्ञान आहे. जपानी कंपन्यांना भारतात सौर क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे […]
विदर्भ
तहसील कार्यालय मूलचेरा येथे २८ एप्रिल हा दिवस पहिला”सेवा हक्क दिन” म्हणून साजरा
राज्य सेवा हक्क आयोग तसेच आपले सरकार पोर्टलच्या माध्यमाने “नागरिकांना सुलभ, पारदर्शक वेळेत सेवा देणे तहसिलदार चेतन पाटील मुलचेरा :- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीस दहा वर्ष पूर्ण होत असल्याने, या दशकपूर्तीचे औचित्य साधून मुलचेरा तालुक्यात २८ एप्रिल रोजी तहसिल कार्यालय यथे “सेवा हक्क दिवस” विविध उपक्रम राबवून हा दिवस जनसहभागासह साजरा […]
मार्कंडा मंदिराच्या जिर्णोद्धाराला गती द्या– सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
नऊ कोटींच्या विकासकामांना लवकरच होणार सुरुवात गडचिरोली दि. २५ – राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज मार्कंडा देवस्थान येथे भेट देऊन मंदिराच्या जिर्णोद्धार व विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पुरातत्व विभागाला अधिक कामगार नियुक्त करून मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम गतीने काम पूर्ण […]
जागतिक हिवताप दिनानिमित्त प्रभातफेरीतून जनजागृती
“हिवतापाला संपवू या : पुन्हा योगदान द्या, पुनर्विचार करा, पुन्हा सक्रिय व्हा” या संकल्पनेखाली आज जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून गडचिरोलीत विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हिवताप निर्मूलनासाठी जनतेला सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने शहरातून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे व जिल्हा शल्य चिकित्सक […]
गावागावातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन : जलरथाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी
महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ आणि ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या महत्वाकांक्षी योजनेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलरथाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज रवाना करण्यात आले. यावेळी जलसंधारण अधिकारी अमित राऊत, व्ही.बी. सयाम, उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष महेंद्र मंडलेचा, डॉ. गणेश जैन, निरज बोथरा […]
“दिव्यांग कल्याणासाठी परिणामकारक योजना प्रस्तावित करा” – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा जिल्हा नियोजनचा १ टक्का निधी दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवणार
गडचिरोली दि.24 : –जिल्हा नियोजनच्या विकास निधीतून चालू आर्थिक वर्षात दिव्यांग कल्याणासाठी एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार असून त्यातून दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडविणाऱ्या परिणामकारक आणि त्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कामांचे प्रस्ताव सूक्ष्म नियोजनासह तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन व्यवस्थापन समितीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात […]
जलव्यवस्थापन कृति पंधरवडा २०२५ अंतर्गत कोटगल व हल्दीपुरानी उपसा सिंचन योजनांमध्ये पाणी वापर संस्थांना मार्गदर्शन
गडचिरोली, दि. २४ एप्रिल – जलव्यवस्थापन कृति पंधरवडा २०२५ अंतर्गत कोटगल (ता. गडचिरोली) व हल्दीपुरानी (ता. चामोर्शी) उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्थांसाठी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांचे आयोजन नाबार्ड व पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कोटगल सिंचन योजनेच्या कार्यक्रमात ८ पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, सचिव व सदस्य यांच्यासमवेत समाधान व […]
सौर उर्जा प्रकल्पातील विकासकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा आढावा; विकासकांच्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे निर्देश शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणारा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 हा राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 2025 वर्षात सात हजार मेगावॅट सौर उर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. राज्यातील विकासकांना 100 दिवसाला 690 मेगावॅटचा लक्ष्यांक केंद्र सरकारने दिलेला असताना 746 […]
महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावा, लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद मंत्रालयात विशेष कक्ष, महाराष्ट्र सदनातूनही समन्वय मुंबई, दि. 24 : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य […]
जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन
पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24×7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई येथे आज […]