![](https://lokrath.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230913-WA0006-1047x642.jpg)
![](https://lokrath.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230913-WA0006-1047x642.jpg)
अहेरी विधानसभा क्षेत्रातील टिबी रुग्णांना माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी
538267473 या आयडीने नि-क्षय मित्र म्हणून ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत अहेरी विधानसभा क्षेत्रातील टीबीचे उपचार घेत असलेल्या व्यक्तींना पाठिंबा देण्यासाठी नोंदणी केली आहे. राजेंचे बहुमोल सहकार्य भारतातून टीबी दूर करण्यात देशाला मदत होतो आहे करीता भारत सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयद्वारा उपमहासंचालक टि एच यांच्या स्वाक्षरीने सन्मानपत्र प्राप्त झाले.
त्या अनुषंगाने अहेरी येथील रुख्मिणी महालात अहेरी तालुक्याचे क्षयरोग पर्यवेक्षक विजय पोरेड्डीवार आणि सामाजिक कार्यकर्ते पंकज नौनुरवार यांच्या हस्ते सन्मानपत्र राजेंना देण्यात आले.
अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात नोंद झालेल्या क्षय रुग्णांना प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान अंतर्गत बनलेले ‘नि-क्षय मित्र’ माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून गर्जुवंत क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप करणे सुरू आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी तालुक्यातील गर्जुवांत क्षयरोग पीडितांना माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी पुढील सहा महिने रुग्णांना दत्तक घेऊन पालकत्व स्वीकारले आणि त्यांच्या हस्ते पोषण आहार किट वाटप करणे सुरू आहे.
यावेळी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी म्हटले की, गर्जुवंत क्षयरोग रुग्ण असतील तर पुढेही देशहितासाठी सर्वतोपरी सहकार्य करू.
राष्ट्रपतींनी नि-क्षय मित्र उपक्रम सुरू केला, या अंतर्गत क्षयरोगावर उपचार घेत असलेल्यांना अतिरिक्त निदान , पोषण आणि व्यावसायिक मदत सुनिश्चित केली जाते. हे रुग्ण पूर्णपणे बरे व्हावेत या दृष्टीने मदत करण्यासाठी लोक प्रतिनिधी, कॉर्पोरेट, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक व्यक्तींनी दाता म्हणून पुढे यावे असे आवाहन राष्ट्रपती द्रोपती मुर्मु यांनी केले होते.
क्षयरुग्णाना उत्तम उपचार मिळवत यासाठी अतिरिक्त रुग्ण सहाय्य पुरवते तसेच २०२५ पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या भारत सरकारचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचा लाभ उठवण्यासाठी समाजाचा सहभाग वाढवण्यात मदत करेल.
नि-क्षय पोर्टलवर जवळजवळ देशात 13.5 लाख क्षयरोग रुग्णांनी नोंदणी केली आहे, त्यापैकी 8.9 लाख क्षयरोग रुग्णांनी दत्तक योजनेसाठी आपली अनुमती देण्यात आली आहे. नि-क्षय डिजिटल पोर्टल क्षयरोग ग्रस्तांना समुदायाचा आधार मिळवून देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या योजनेपासून एकही क्षय-रुग्ण वंचित राहू नये, यासाठी सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट आस्थापना, लोकनियुक्त प्रतिनिधी आदींनी नि-क्षय मित्र बनून या चळवळीला पाठींबा द्यावा आणि या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी मेळावे आयोजित करावेत त्यात अहेरी तालुका आरोग्य विभागाचे सहकार्य असेल, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे