ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बारामतीतून ; हजारो मराठा बांधवांची मुंबईकडे कूच

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बारामती तालुक्यातून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून हजारो सकल मराठा बांधव वाहनांसह मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले. आज (दि.२४ ) सकाळी नऊ वाजता बारामती शहरातील कसबा येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व अभिवादन करुन समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले.

बारामती : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बारामती तालुक्यातून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून हजारो सकल मराठा बांधव वाहनांसह मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले. आज (दि.२४ ) सकाळी नऊ वाजता बारामती शहरातील कसबा येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व अभिवादन करुन समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले.

कसबा येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान येथे बारामती शहरातील समाज बांधव तालुक्यातील गाव, वाडी, वस्ती वरुन साधारण १५०० चारचाकी वाहन, दहा हजार युवक, वृद्ध, महिला नागरिक जरांगेना साथ देण्यासाठी एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापच, कोण म्हणतंय देत नाय घेतल्याशिवाय रहात नाय अशी जोरदार घोषणाबाजी करत आले.यावेळी आंदोलनातील सर्व चारचाकी वाहने वाहतुकीला अडथळा होणार नाहीत ,अशी ओळीत चालली होती. तर हजारोंच्या संख्येने मराठा बांधव,भगिनी,वृद्ध आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी उत्साहाने चालत होते.आंदोलक मोरगाव मार्गे पुणे व मुंबईकडे रवाना होणार आहेत.यावेळी सहभागी आंदोलनाला येणाऱ्या सर्व समाज बांधवांच्या जेवणाची व्यवस्था व वैद्यकीय प्रथमोपचाराची सोय मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येणार आहे.मनोज जरांगे यांच्या सूचने नुसार आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे.तसेच बारामती तालुक्यातील आंदोलक जरांगे पाटलांच्या आदेशा शिवाय आंदोलन ठिकाणा पासून परत येणार नाहीत.असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगितले.