अमृत योजना महाराष्ट्र ही एक आर्थिक मदत योजना आहे, महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेत शासकीय संगणक टंकलेखन (GCC/TBC) किंवा लघुलेखन परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना 6,500 रुपयांची मदत दिली जाते.
पात्रता निकष खालीलप्रमाणे :
– उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
– उमेदवाराने 10 वी पास असणे आवश्यक आहे.
– उमेदवार शासकीय संगणक टंक लेखन (GCC-TBC) किंवा लघुलेखन परीक्षा पास झालेला असावा.
योजनेचे फायदे जाणून घ्या :
– तुम्ही 30, 40, 50, 60 WPM वेगाने मराठी / हिंदी / इंग्रजी मध्ये परीक्षा पास असाल तर, तुम्हाला 6,500 ₹ अर्थसहाय्य मिळेल.
– तुम्ही 60 ते 160 WPM पर्यंत वेगाने मराठी/हिंदी मध्ये परीक्षा पास असाल तर, तुम्हाला 5,300 रूपये आर्थिक सहाय्य मिळेल.
