मुख्याध्यापकांना प्रत्येक विद्यार्थी तपासणीसाठी हजर राहील याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. तसेच, तपासणीनंतर गरजूंना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्याचे नियोजन शाळांनी स्थानिक आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधून करावे लागेल. सर्व तपासण्या सुरक्षित व अद्ययावत यंत्रसामग्रीच्या सहाय्याने करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी शासनाची ही पाऊले मैलाचा दगड ठरणार आहेत.
विशेष म्हणजे, गंभीर स्थितीतील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारमान्य १०४ प्रकारच्या शस्त्रक्रिया तातडीने आणि मोफत करण्यात येणार आहेत. या सेवेसाठी विमा कंपन्यांचा सहभाग न घेता थेट ॲश्युअरन्स मोड अंतर्गत राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत उपचार उपलब्ध करून देण्यात येतील.
यासाठी याआधीच नंदुरबार, गडचिरोली, उस्मानाबाद, ठाणे, बीड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विशेष समित्या तयार झाल्या आहेत. त्याच धर्तीवर आता उर्वरीत जिल्ह्यांमध्येही समित्या स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच प्रत्येक आणि जिल्हा स्तरावर तपासणीचे वेळापत्रक बनवून त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल.
मुख्याध्यापकांवर जबाबदारी –
मुख्याध्यापकांना प्रत्येक विद्यार्थी तपासणीसाठी हजर राहील याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. तसेच, तपासणीनंतर गरजूंना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्याचे नियोजन शाळांनी स्थानिक आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधून करावे लागेल. सर्व तपासण्या सुरक्षित व अद्ययावत यंत्रसामग्रीच्या सहाय्याने करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी शासनाची ही पाऊले मैलाचा दगड ठरणार आहेत.
