ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यात पुढील दोन दिवस उष्णेतेची लाट ! – हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

जून महिना संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. मात्र राज्यात अजूनही पाऊस पडला नाही. अशातच आता भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस प्रामुख्याने विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

 *’या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी*

 विदर्भातील गोंदिया भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस उष्णतेची लाट असणार आहे त्यामूळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.