ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र रोजगार विदर्भ

राज्यात लवकरच तलाठी भरती, तब्बल एक हजार पदे भरली जाणार

महाराष्ट्र सरकारने महसूल विभागांतर्गत तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात तलाठी सर्व वर्गातील भरण्यात येणाऱ्या 1000 पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी. असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते त्यावेळेस ते म्हणाले लवकरच राज्यातील उर्वरित एक हजार पदांसाठी भरती होणार असून, त्या कामाला वेग देण्याचा राज्य सरकार करणार आहे. तसेच या बैठकीत महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता व महसूल विभागाचे सहसचिव श्री राम यादव यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री विखे पाटील म्हणाले की गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती तलाटी संबंध येत असतो. त्यामुळे सात-बारा दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांचा संपर्क करावा लागत आहे सध्या राज्यातील त्यांच्याकडे तीन ते चार गावांचा पदभार असल्याने, गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना ठरवून घेणे या बरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे.

शेतकरीवर्ग सकाळच्या वेळात महसूल किंवा तहसील कार्यालय देतो असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेस लवकर कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा बार कमी होण्यास मदत होणार असून त्यामुळे या तलाठी भरती ला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

https://twitter.com/MahaDGIPR/status/1581998141447892992?t=T2ZtL9Nj1xzjRAeQnBUvCQ&s=19

तलाठी/ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे, कार्यालयीन भाडे देणे तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. याशिवाय महसूल विभागाअंतर्गत नायब तहसीलदार परीक्षा आणि पदोन्नतीबाबतचे निकष तपासून याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यावेळी म्हणाले.