मुलचेरा :- केंद्र शासना मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2022 योजनेतील शेतकऱ्यांना त्यांच्या विमाची पावती घरपोच देण्यात येणार आहे.उपक्रमाची सुरुवात तालुका कृषीअधिकारी कार्यालय मुलचेरा येथे शेतकऱ्यांना विम्याची पावती देण्यात आली.हा उपक्रम ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत संपुर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.या उपक्रमाचे उदघाटन 15 सप्टेंबर रोजी तालुका कृषि अधिकारी श्री.विकास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी. श्री. व्ही. एस. हारगुळे कृषी पर्यवेक्षक , श्री.दीपक बलकर कृषिसहाय्यक,कनिष्क वाघमारे कृषिसहाय्यक, शिवपाल डोरे कृषी सहाय्यक. तिरुपती कौशल्ये, कृषिसहाय्यक ,निलेश मडावी लिपिक ,पवन होमने लिपिक ,परेश वासनिक लिपिक , विमा प्रतिनिधी राजेश गुंतीवार यांनी उपस्थित होते.
Related Articles
अयोध्यानगरीत महाराष्ट्र भक्त निवासचे निर्माण व्हावे – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई दि. 17 : उत्तर प्रदेशातील अयोध्यानगरीत प्रभू श्रीराम मंदिराजवळ महाराष्ट्र भक्त निवास उभारण्यात यावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे अतिभव्य पुनर्निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील अयोध्यानगरीत श्रीराम जन्मस्थळी दर्शनासाठी भाविक फार मोठ्या […]
पाचव्या राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धांना सुरुवात – क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या शुभेच्छा
मुंबई, दि. 30 : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आजपासून पाचव्या राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. यानिमित्त महाराष्ट्राच्या संघाला क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्राचा संघ या स्पर्धेत पदकांचे त्रिशतक पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मंत्री श्री. महाजन यांनी म्हटले आहे, दोन वेळेचा विजेता महाराष्ट्र […]
महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम
क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी केले अभिनंदन मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेचे ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी त्यासाठी संचालनालयाचे अभिनंदन केले आहे. राज्य […]