१०० दिवसांच्या कामकाज आराखड्यासंदर्भात बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आखून दिलेल्या १०० दिवस आराखड्यात निश्चित केलेल्या उद्दिष्टांची १०० टक्के पूर्तता होण्याकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. या बैठकीस उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी […]
ताज्या बातम्या
‘एआय’ सेंटर्स ऑफ एक्सलन्ससाठी महाराष्ट्र शासन, मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाला. करारावर महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मायक्रोसॉफ्टचे वेंकट कृष्णन यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास […]
कृषी विद्यापीठासाठी शेतीयोग्य जागेचा शोध दहा दिवसात घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोल्हापुरात ‘आयटीहब’ उभारण्याचा मार्ग मोकळा कोल्हापुरच्या शेंडापार्क येथे ‘आयटीहब’ उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची 34 हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात येणार असून कृषी विद्यापीठाला शेती, शिक्षण, संशोधन आदी कार्यासाठी पर्यायी जागा म्हणून कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यातील 60 ते 100 हेक्टर एकत्रित जागेचा शोध घेण्यात यावा. येत्या दहा दिवसात कृषी विद्यापीठाच्या सहमतीने पर्यायी जागा अंतिम करावी, असे निर्देश […]
राज्यातील सर्व शाळा सकाळ सत्रात भरणार, असे आहे नवीन वेळापत्रक
राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने एक अधिकृत आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये राज्यातील सर्व शाळा केवळ सकाळी पाळीत चालवण्याचे बंधनकारक केले आहे. सर्व शाळांना नवीन वेळ लागू अति उष्णतेच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी व्यवस्थापन किंवा शिक्षणाचे माध्यम विचारात न […]
विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सागरी व्यापार क्षेत्राचा समग्र विकास आवश्यक -राज्यपाल सी पी राधाकृष्णन
जगातील ९०% व्यापार आजही सागरी मार्गाने होतो. समुद्र मार्गाने होणारा व्यापार हा भारतीय व्यापार तसेच अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सागरी क्षेत्राचा समग्र विकास होणे अतिशय आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. सागरी व्यापार क्षेत्रातर्फे साजरा केल्या जाणाऱ्या ६२ वा राष्ट्रीय सागरी दिवसाचे तसेच मर्चंट नेव्ही […]
सावधान: तीन महिन्यांत चलन भरले नाही तर ड्रायव्हिंग लायसन रद्द करणार; नवा नियम वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरणार
वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणात जर तुम्हाला चलन आले असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडणार आहे. जरी मेसेज आला नाही तरी आता मोबाईलवर तुमच्या वाहनाला आलेली चलने पाहता येतात. यामुळे ती तपासत रहा, नाहीतर तीन महिन्यांनी तुमचे ड्रायव्हिंग लायसन रद्द केले जाणार आहे. लायसन रद्द झाल्यानंतर जर तुम्ही वाहन चालविताना अपघात झाला तर विना परवाना वाहन […]
कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणाऱ्या मधमाशीपालन व्यवसायाकडे वळा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे युवा शेतकऱ्यांना आवाहन
गडचिरोली, २६ मार्च २०२५ – मधमाशी पालन हा कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारा, पर्यावरणपूरक आणि शाश्वत व्यवसाय असून जिल्ह्यातील तरुणांनी व शेतकऱ्यांनी स्वावलंबनासाठी व आर्थिक उन्नतीसाठी या व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर – गडचिरोली येथे “शास्त्रोक्त मधमाशीपालन प्रशिक्षण” या सात […]
दिव्यांगांसाठी रोजगाराचे नवे दालन जिल्हा प्रशासन आणि यूथ 4 जॉब्स फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार
जिल्हा प्रशासन आणि यूथ 4 जॉब्स फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार गडचिरोली जिल्ह्यात दिव्यांग युवक-युवतींच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि यूथ 4 जॉब्स फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या करारावर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व यूथ 4 जॉब्स तर्फे राज्य समन्वयक […]
बांधकाम कामगारांसाठी निवृत्तीवेतन योजना– कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी ₹१२००० इतके निवृत्तीवेतन देण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली. कामगार मंत्री ॲड.फुंडकर म्हणाले की, सन १९९६ मध्ये केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या हितासाठी कायदा लागू केला. त्यानुसार, महाराष्ट्र राज्याने २००७ मध्ये नियम आखले आणि २०११ मध्ये महाराष्ट्र इमारत […]
कीर्तनाची परंपरा हा अमूल्य ठेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोनी मराठी वरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ कार्यक्रमाला शुभेच्छा मुंबई दि. २५ : कीर्तनाची परंपरा फार जुनी आहे. या परंपरेशी सर्व प्रकारचे लोक जोडले गेले. ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांनी जपली. स्वराज्याच्या स्थापनेमध्ये या संत शक्तीचा, कीर्तन शक्तीचा, प्रबोधनाचा प्रचंड मोठा वाटा आहे. म्हणूनच ही परंपरा अमूल्य ठेवा आहे, की जो पुढच्या पिढ्यांपर्यंत नेण्याचे काम करणे गरजेच आहे, असे […]