-विमानतळ विकास कामांचा बैठकीत घेतला आढावा- मुंबई, दि.4 : रत्नागिरी विमानतळावरून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू व्हावी यासाठी पायाभूत सुविधांकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. याअनुषंगाने विमानतळाच्या परिसरातील विकास कामांचे सुनियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. रत्नागिरी विमानतळ विकासाबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या […]
राज्य
पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ८९ कोटींचा निधी; पर्यटनस्थळांच्या सौंदर्यीकरणासह पर्यटकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध होणार
मुंबई, दि. 4 : पर्यटनस्थळांवर विविध उपाययोजना करण्यासाठी शासनाने सन २०२१-२२ मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ८९ कोटी ४९ लाख १९ हजारांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत पर्यटनस्थळांच्या सौंदर्यीकरणासह पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या अनुषंगाने जिल्हास्तरावरील नवीन कामांना निधी उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जारी […]
“समान संधी केंद्र” च्या वतीने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन विकास व गुणवत्ता वाढीसाठी समाज कल्याण विभागाचा प्रयत्न
गडचिरोली, दि.03: विविध महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्रीशिप व इतर शासनाच्या योजना व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबत उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन करण्यात येते. संवाद अभियान- युवा संवाद सारखे कार्यक्रम सुरु करण्याकरिता महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी “समान संधी केंद्रे” -(Equal Opportunity Centre) स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक […]
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश
गडचिरोली, दि.02: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळामध्ये शिक्षण देणे या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली व 2 री मध्ये प्रवेश देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय गडचिरोली मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.इ यत्ता 1 ली व 2 री मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा व दिनांक 01 […]
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारी पासून भरता येणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
मुंबई, दि. 2 – शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार दि. ०१ फेब्रुवारी २०२२ पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई पोर्टलवर सदरचे अर्ज दि. ०१ फेब्रुवारी २०२२ ऐवजी बुधवार दि. १६ फेब्रुवारी २०२२ पासून भरता येतील, संबंधितांनी या […]
शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी १ टक्का कमी व्याज दराने अर्थसहाय्य, शासन निर्णय जारी
राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना ६% व्याज दराने अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार, केंद्र शासनाचे धोरणानुसार बँका ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना ७% व्याज दराने कर्ज पुरवठा करणार आहेत. त्या ठिकाणी बँकांनी ७% ऐवजी शेतकऱ्यांना ६% व्याज दराने कर्ज पुरवठा करावा, असे राज्य शासनाचे धोरण आहे. या प्रयोजनासाठी १% व्याज […]
एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ
ओमायक्रॉन या नवीन कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्याने एसटी महामंडळाने खबरदारीचे पाऊल टाकत ज्येष्ठ नागरिक व इतर सवलत धारकांच्या “स्मार्ट कार्ड ” योजनेला दि.31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली आहे. राज्य परिवहन सेवेतील प्रवासासाठी दि.1 एप्रिल 2022 पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात […]
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी ई-मॉनिटरिंग प्रणाली – कृषी मंत्री दादाजी भुसे
शेतकऱ्यांना वेळेत आणि वाजवी किमतीत बियाणे आणि किटकनाशके मिळावीत. उत्पादक कंपन्यानी तयार केलेली उत्पादने उत्तम दर्जाची असावीत. बी-बियाणे आणि किटकनाशकांची विक्री होताना त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये, यासाठी उत्पादक कंपन्या आणि त्यांच्यामार्फत तयार होणारी उत्पादने यांचे ट्रॅकिंग होणारी यंत्रणा लवकरच कार्यांवित करण्यात येत असून यासाठी ई-मॉनिटरिंग प्रणाली विकसित करण्यात येत असल्याची माहिती कृषी मंत्री […]
मनरेगा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या यंत्रणासाठीचे मानव संसाधन विकास व्यवस्थापनाबाबत शासन निर्णय जारी
महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेचा जनक आहे. त्या आधारे भारत सरकारने २००५ साली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा केला. या कायद्याची अंमलबजावणी करतांना दक्षिण भारतातील राज्यांनी (उदा. आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू इ.) राज्यातील विकास योजनांची जोड देऊन त्यास विकासाची योजना म्हणून राबवायला सुरुवात केली. असे केल्याने त्यांना भारत सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही शासनाकडून […]
तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना नवनिर्मित नगरपरिषद/नगर पंचायतीत सामावून घेणार – नगरविकास विभागाचा निर्णय
ज्या ग्रामपंचायतींचे नगर परिषद अथवा नगर पंचायतीत रुपांतर झाले आहे, तेथील सफाई कर्मचाऱ्यांना या नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये रिक्त जागांनुसार सामावून घेण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय आज सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यभरातील १४७७ सफाई कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. नवनिर्मिती नगर परिषदा व नगर पंचायतींच्या आकृतीबंधात सफाई […]